पुणे : भारत गौरव यात्रा रेल्वे मध्ये प्रवाशांना अन्नातून विषबाधा (Pune News) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या विषबाधेमुळे अनेक प्रवाशांची परिस्थिती गंभीर झाली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांची प्रकृती आता ठीक असल्याचे समजत आहे. चेन्नई वरून पुण्याकडे येत असलेल्या भारत गौरव रेल्वेगाडीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एकूण 40 प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाली आहे.
भारत गौरव यात्रा रेल्वे मध्ये 40 प्रवाशांना अन्नातून विषबाधा pic.twitter.com/301dNZbIb0
— TOP NEWS MARATHI (@Topnewsmarathi) November 29, 2023
मध्यरात्रीच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रवाशांना तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याने त्यांच्यावर त्वरित उपचार झाले. वेळीच उपचार मिळाल्याने सध्या सर्व 40 प्रवाशांची प्रकृती ठीक आहे. सुदैवानं कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. मात्र ही विषबाधा नेमकी कशामुळे झाली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Datta Dalvi Arrested : ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक
Maruti Navale : पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवलेंवर गुन्हा दाखल
Cylinder Blast : चेंबूरमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट; 4-5 घरे आगीच्या भक्षस्थानी