IND Vs AUS

Ind Vs Aus : मेगाफायनलला पावसाने घोळ घातल्यास विजेता कोण होणार? ICC चा नियम काय सांगतो?

900 0

मुंबई : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus) यांच्यातील फायनलची सगळे क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. उद्या रविवारी (19 नोव्हेंबर) अहमदाबादमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus) यांच्यात अंतिम सामना होणार आहे. तब्बल 20 वर्षांनी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हा फायनलचा सामना रंगणार आहे. मात्र या सामन्यादरम्यान जर पाऊस पडला तर कोणता संघ विजयी होईल? असा प्रश्न बऱ्याच क्रिकेटप्रेमींना पडला असेल. चला तर मग आज या बद्दल जाणून घेऊया…

सामन्यात पाऊस पडला तर काय होईल?
रविवारी हवामान स्वच्छ राहील. पण पाऊस पडला तर? असा प्रश्न मनात येऊ शकतो. पावसामुळे सामना पूर्णपणे वाहून गेला तर तो राखीव दिवशी खेळवला जाईल. आयसीसीने फायनलसाठी राखीव दिवस ठेवला आहे. जेव्हा सामना 20-20 षटकांचा खेळला जाऊ शकत नाही तेव्हा राखीव दिवस लागू केला जातो. आणि राखीव दिवशीही पाऊस पडला आणि सामना पूर्णपणे वाहून गेला, तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाते. विशेष म्हणजे विश्वचषकाच्या 48 वर्षांच्या इतिहासात आजपर्यंत एकही अंतिम सामना राखीव दिवशी खेळवला गेलेला नाही.

रविवारी अहमदाबादमध्ये हवामान कसे असेल?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना अहमदाबाद येथे होणार आहे. रविवारी अहमदाबादमध्ये पावसाची शक्यता नाही. हवामान खात्यानुसार रविवारी हलका सूर्यप्रकाश असेल. दिवसाचे कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस राहील.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News: पुण्यात नामदेव जाधवांच्या तोंडाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळ फासलं

Junnar Accident : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा जुन्नरमध्ये भीषण अपघात

Caste Certificate : 45 दिवसांत मिळेल जात प्रमाणपत्र; ‘या’ कागदपत्रांसह करा अर्ज

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!