कोल्हापुरात उपचारादरम्यान माझ्या हत्येचा कट रचला गेला ; नितेश राणे यांचा गंभीर आरोप

183 0

मुंबई- कोल्हापुरात उपचारादरम्यान माझ्या हत्येचा कट रचला गेला असा गंभीर आरोप आमदार नितेश राणे सभागृहात बोलताना केला. पण एका कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे मी वाचलो असे नितेश राणे म्हणाले.

आमदार नितेश राणे म्हणाले की, मी कोल्हापुरातील रुग्णालयात अॅडमिट असताना अचानक डॉक्टरांनी मला सीटी एन्जिओ टेस्ट करण्याची गरज असल्याचं सांगितलं

पण एका कर्मचाऱ्याने मला सांगितलं की साहेब, हे सीटी एन्जिओ करु नका. त्या निमित्ताने इंक शरीरात टाकली जाईल आणि त्यामधून तुम्हाला मारुण टाकण्याचा प्लॅन आहे. या कर्मचाऱ्याने मला आधीच सांगितल्याने मी जिवंत राहिलो.

नितेश राणे पुढे म्हणाले की, या राज्यात गुन्हे वाढत आहेत. पण राज्य सरकारकडून त्या संबंधी खोटी माहिती दिली जात आहे. फार मोठ्या मोठ्या गोष्टीत या लोकांना लक्ष घालायचे आहे, यांना फार मोठी काम करायची आहेत. विरोधी पक्षातील लोकांवर गुन्हे दाखल करायचे आहेत. पालिकेला तर काहीच काम राहिले नाही.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!