मध्य प्रदेश : मध्य प्रदेशच्या इंदौरहून नाशिकला येणाऱ्या मध्य प्रदेश परिवाहनच्या बसचा अपघात (Accident News) झाल्याची घटना समोर आली आहे. ही बस बिजासन घाटात आली असता (Accident News) मागून येणाऱ्या ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने अनियंत्रित होऊन तो समोरील बसवर आदळला. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर 30 जण जखमी झाले आहेत.
काय घडले नेमके?
धुळ्यानजीकच्या महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर हा अपघात झाला आहे. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. ब्रेकफेल झाल्यामुळे ट्रकने बसला मागून धडक दिल्याने बस मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर पलटली होती. ही बस शेंधवाहून शिरपूरच्या दिशेने निघाली होती.
या अपघाताची माहिती मिळताच बिजासन पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बस रस्त्यावरच पलटी झाल्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी शेंधवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात दोघांना आपला जीव गमवावा लागला मात्र त्यांचे नाव अद्याप समजू शकलेले नाही.