Mantralaya

Cabinet Meeting : मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ मोठे निर्णय

462 0

मुंबई : मुंबईमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting) पार पडली. या बैठकीमध्ये (Cabinet Meeting) अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये महत्वपूर्ण निर्णय म्हणजे वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात आले आहे. तर एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू असं नाव देण्यात आलं आहे. तसेच दारीद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना देखील मोफत गणवेश वाटप करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आला.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

आजच्या बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय
1) वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव देण्यात आले.
2) एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू नाव देण्यात आले.
3) दारीद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना देखील मोफत गणवेश वाटपाचा निर्णय घेण्यात आला.
4) संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील लाभधारकांच्या निवृत्तीवेतनात भरीव वाढ करण्यात आली.
5) असंघटीत कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळाची स्थापना करण्यात येणार आहे.
6) नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात विदर्भाचा समावेश करण्यात आला आहे.
7) मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक छत्रपती संभाजीनगरमध्ये उभारण्यासाठी 100 कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!