रत्नागिरी : राज्यात सध्या अपघाताचे सत्र सुरूच आहे. रत्नागिरी (Ratnagiri Accident) जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील हर्णे मार्गावर रविवारी संध्याकाळी मॅक्झिमो आणि ट्रेलर यांच्यात भीषण अपघात झाला.हा अपघात (Ratnagiri Accident) एवढा भीषण होता कि या अपघातात बाप-लेकीसह आठ जणांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये मॅक्झिमोचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातामुळे दापोली आणि हर्णे पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे. या अपघातानंतर ट्रेलर चालकाने घटनास्थवरून पळ काढला आहे.
साताऱ्यात भीषण अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली कॅनॉलमध्ये कोसळून 5 जणांचा मृत्यू
कसा घडला अपघात?
दापोली तालुक्यातील हर्णे मार्गावर आसूद जोशी बागेजवळ काल संध्याकाळच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. बांधकाम साहित्य रिकामं करुन आलेला रिकामा ट्रेलर दापोलीच्या दिशेने येत होता तर समोरुन मॅक्झिमो हर्णेच्या दिशेने जात होती. यावेळी वडाप गाडीत 14 प्रवासी होते. दोन्ही गाड्या जोशी बागेजवळ अवघड वळणावर आल्या. यावेळी ट्रेलरने बाहेरुन वळण घेतले. यामुळे मॅक्झिमोला पुढे जाण्यासाठी रस्ताच राहिला नाही.याचवेळी ट्रेलरने या गाडीला जोरदार धडक दिली आणि हा अपघात झाला.
या अपघातात (Ratnagiri Accident) मृत्यू झालेले सर्व दापोली तालुक्यातील होते. अपघाताची माहिती मिळताच दापोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने जखमींना उपचारांसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अपघातात मॅक्झिमो गाडीचा चालक अनिल सारंग यांचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रेलर चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला.