पुणे : काल सुप्रीम कोर्टाने महाराष्टाच्या सत्ता संघर्षाचा निर्णय दिल्यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. त्यातच आता येत्या 20 किंवा 21 मे रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे. तसेच या मंत्रिमंडळात त्यांना संधी देण्यात येणार असल्याचे देखील ते म्हणाले आहेत.
