नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पीएम किसान (PM Kissan) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये पाठवले जातात. आतापर्यंत या योजनेचे 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे 14 हप्ता जमा कधी होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षात 2 हजारांचे 3 हफ्ते पाठवले जातात.
1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले आहे. पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान, दुसरा ऑगस्ट आणि नोव्हेंबर दरम्यान आणि तिसरा डिसेंबर ते मार्च दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला जातो. सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता एप्रिल ते जुलै महिन्यात येणार होता. आता एप्रिल आणि मे दोन महिने सरले आहेत. त्यामुळे हा हफ्ता आता जुलै महिन्यात येईल अशी माहिती मिळाली आहे. याअगोदर ज्या शेतकऱ्याची (Farmer) ई केवायसी केली नाही अशा शेतकऱ्यांना तेरावा आणि चौदावा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे ज्यांची ई केवायसी बाकी आहे त्यांनी ती लवकरात लवकर करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
सोलापूर हादरलं ! आजीच्या डोळ्यासमोर 10 वर्षांच्या नातवाने सोडला जीव
ई केवायसी कशी कराल?
प्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. त्याठिकाणी उजव्या बाजूला केवायसी (E-KYC) ऑप्शन असेल त्याच्यावर क्लिक करा. यानंतर त्या ठिकाणी आधार कार्ड नंबर आणि कॅप्चर कोड अपलोड करा. यानंतर तुम्ही सर्चवर क्लिक करा. त्यानंतर आधार कार्डशी जोडलेला नंबर इथे अपलोड करा. यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. तिकडं ओटीपी टाकून सबमिट करा. अशाप्रकारे तुम्ही घरबसल्या आपली ई केवायसी अपडेट करू शकता.