काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यावर नाना पटोले यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, “माझ्या विरोधात चालू असलेल्या राजकारणावर मी लक्ष देत नाही…!”

756 0

आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेते पदाचा राजीनामा दिला आहे. सत्यजित तांबे यांना उमेदवारी नाकारल्या बाबत बाळासाहेब थोरात यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना देखील बाळासाहेब थोरात यांनी पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नाना पटोले यांच्यासोबत काम करणे अवघड आहे. नाना पटोले यांच्या मनमानी कारभाराविरोधात त्यांनी थेट शब्दात पत्र लिहून नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते.

अधिक वाचा : आजची सर्वात मोठी बातमी : बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा; प्रदेश काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर

दरम्यान बाळासाहेब थोरात यांच्या विधिमंडळ पक्षनेते पदाच्या राजीनाम्यानंतर नाना पटोले यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “गेल्या काही दिवसात बाळासाहेब थोरात यांच्याशी माझा कोणताही संपर्क झालेला नाही. बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा अद्याप माझ्यापर्यंत आलेला नाही. मात्र काँग्रेस हाय कमांडचे पक्षातील गटबाजीवर लक्ष आहे. माझ्या विरोधात चालू असलेल्या राजकारणावर मी लक्ष देत नाही. माझ्यासमोर राज्यसमोर इतरही अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. असं यावेळी नाना पटोले म्हणाले आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!