सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण पहिलं की आपसूकच 1989 मध्ये जब्बार पटेल दिग्दर्शित सिंहासन चित्रपटाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. सध्या महाराष्ट्राच्या राजकारण असंच काही नाट्यमय घडामोडी घडताना दिसत असून अगदी क्षणात संपूर्ण राजकारणचं बदलत असल्याचं पाहायला मिळत.
सध्या महाराष्ट्रात एकमेकांवर सुरू असलेले वैयक्तिक हेवेदावे शिंतोडे आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी यामध्ये सर्वसाधारण जनता भरडली जात आहे. सत्तेच्या राजगादीवर पोहोचण्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करताना दिसत असून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सर्वसामान्य जनता यांचा आजही विसर या राज्यकर्त्यांना पडताना दिसत आहे. अरुण साधू यांच्या ‘मुंबई दिनांक’ व ‘सिंहासन’ या कादंबऱ्यातील निवडक प्रसंगावर आधारित असलेल्या सिंहासन चित्रपटात जब्बार पटेल यांनी हेच हेरलं आहे.
सिंहासन चित्रपट दिग्दर्शित होऊन 44 वर्ष झाले मात्र 44 वर्षानंतर देखील महाराष्ट्राचा राजकारण अशाच नाट्यमय घडामोडी वर अवलंबून असून ज्याप्रमाणे सिंहासन चित्रपटाच्या शेवटी पत्रकार असणाऱ्या दिगू टिपणीसला वेड लागतं अगदी तसंच सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण पाहून आम्हा पत्रकारांचा दिगु होऊ नये म्हणजे झालं !
– संकेत देशपांडे
रिपोर्टर, TOP NEWS मराठी