FLASHBACK 2022: ‘या’ आहेत 2022 मधील मोठ्या राजकीय घटना

278 0

महाराष्ट्राच्या राजकारणात 2022 हे वर्ष प्रचंड उलथापालथ करणारं ठरलं. शिवसेनेची दोन शकलं करणारं सर्वांत मोठं राजकीय बंड याच वर्षात घडलं पाहुयात TOP NEWS मराठीचा स्पेशल रिपोर्ट 2022 मधील मोठ्या राजकीय घटना…

1) या वर्षातील सर्वात मोठी राजकीय घटना या वर्षाच्या अगदी सुरूवातीला मोठी राजकीय घटना घडली ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत चूक 5 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाबच्या एका मोठ्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी जात होते. परंतु अचानक फिरोजपूर जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवून धरला होता. त्या वेळेस पंतप्रधानांचा ताफा एका पुलावर 15-20 मिनिटांसाठी अडला होता. हे ठिकाण पाकिस्तानच्या सीमेपासून फक्त 20 किमी अंतरावर असल्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेत झालेली ही सर्वात मोठी चूक मानण्यात आली होती.

2) 5 राज्यातील निवडणुकांचे निकाल
10 मार्च रोजी उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर राज्याच्या विधानसभांचे निकाल लागले होते. यात देशातील सगळ्यात मातब्बर राज्यात म्हणजेच उत्तर प्रदेशामध्ये भाजपाची पुन्हा एकदा स्पष्ट बहुमताने सत्ता आली आणि योगी आदित्यनाथ हे यूपीचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. यासोबतच गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये देखील भाजपाची सत्ता आली. तर काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पंजाब आपनं काबीज करत सत्ता प्रस्थापित केली

3) महाराष्ट्र, बिहारमधील सत्तांतर जून महिन्यात एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड केलं आणि सगळे सुरत, गुवाहाटीला पोहोचले. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीची सरकार कोसळली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

उद्धव ठाकरे यांच्यानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटत होतं तेव्हा फडणवीसांनी सत्तेत सहभागी होत नसल्याचं सांगितलं. मात्र अचानक देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली

महाराष्ट्राबरोबरच बिहारमध्ये देखील सत्तांतर झालं भाजप आणि जनता दल युनायटेडच्या युतीमध्ये मुख्यमंत्री असलेल्या नितीश कुमारांनी अचानक एनडीएतून बाहेर पडून काँग्रेस प्रणित आघाडीत प्रवेश केला आणि परत एकदा मुख्यमंत्री झाले. नितीश कुमार यांच्या या पालटीमुळे ते केव्हा कुणासोबत जातील हे वाक्य चर्चेत आलं.

4) भारत जोडो यात्रा

7 सप्टेंबरला 2022 रोजी तामिळनाडूच्या कन्याकुमारीमधून भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली. मजल दरमजल करत कन्याकुमारीहून काश्मीरकडे पायदळ निघालेली ही यात्रा आत्तापर्यंत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांना ओलांडून हरियाणामध्ये पोहोचली आहे. सध्या ही यात्रा दिल्लीमध्ये दाखल आहे .

5) गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणूक

डिसेंबर 2022 मध्ये पार पडलेली गुजरात आणि हिमाचल प्रदेश राज्याची निवडणूक अनेक कारणांनी महत्वाची ठरली. नेहमीच्या नियमाप्रमाणे हिमाचल प्रदेशात सरकार बदलली आणि काँग्रेसची सत्ता आली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या होम ग्राउंडवर भाजपनं 156 जागांवर ऐतिहासिक विजय मिळवला. तर काँग्रेसला ऐतिहासिक पराभवाचा सामना करावा लागला.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!