मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारला पुन्हा एकदा मोठा दणका दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीतील बहुतांश प्रमुख नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली असून माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा मात्र कायम ठेवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे माज विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांचे खाजगी सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षित मात्र वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री धनंजय मुंडे, नवाब मलिक, छगन भुजबळ, वरून सरदेसाई, नितीन राऊत, सतेज पाटील, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, संजय राऊत यांची सुरक्षेमध्ये कपात करण्यात आली आहे.