महाराष्ट्र : राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये 547 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकांमध्ये 76 टक्के मतदान झाले आहे. शिंदे भाजपा गटाने ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांमध्ये 76 , काँग्रेसने 20 आणि राष्ट्रवादीने 31 तर आघाडीने 61 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे.
547 ग्रामपंचायतींचा आज निकाल लागला असून त्यापैकी 51 ग्रामपंचायतींनमध्ये बिनविरोध निवडणूक झाली आहे. तर 16 जिल्ह्यांमध्ये 608 ग्रामपंचायत आणि थेट सरपंचपद निवडीसाठी रविवारी देखील मतदान घेण्यात आले.