मुंबई : आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान अनेक वादविवाद , आरोप-प्रत्यारोप आणि धक्काबुक्की नंतर आज पुन्हा सत्ताधाऱ्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले आहे. सत्ताधाऱ्यांनी आज विरोधकांना कोंडीत धरण्यासाठी घोषणाबाजी केली आहे . यावेळी ” खड्ड्यांचे खोके… मातोश्री ओके…!” अशी घोषणाबाजी सत्ताधाऱ्यांनी केली आहे.
या आंदोलनामध्ये शिंदे गटातील आमदार आक्रमक झाले असून , यावेळी शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. यावेळी बॅनरबाजी करून आदित्य ठाकरे यांना टार्गेट करण्यात आला आहे . या पोस्टरवर ” युवराजांची कायमच दिशा चुकली ” असे लिहून आदित्य ठाकरे यांना टार्गेट करण्यात आले आहे .