मुंबई : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या अर्थसंकल्पातून शिक्षणासाठी मोठी तरतूद केली आहे. विद्यार्थ्यांचा सरकारी शाळांकडील ओढा वाढावा म्हणून फडणवीस यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देण्याची घोषणा फडणवीस यांनी केली आहे. तसेच शिक्षण सेवकांच्या पगारातही घसघशीत वाढ केली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये आनंदाचं वातावरण असून फडणवीस यांच्या घोषणेचं स्वागत केलं जात आहे.
