#MAHARASHTRA POLITICS : अखेर राज्यातील सत्ता संघर्षावर येत्या दोन दिवसात निकाल लागणार ?

561 0

नवी दिल्ली : राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज आणि उद्या सुनावणी होते आहे. अनेक दिवसांपासून ज्या सत्ता संघर्षावर केव्हा निकाल लागणार याकडे संपूर्ण महाराष्ट्र लक्ष देऊन आहे. याचा निर्णय येत्या दोन दिवसात लागण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार असून आज दिवसभरात आणि उद्या दुपारपर्यंत शिंदे गटाचा युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर दुपारनंतर ठाकरे गट अंतिम युक्तिवाद करणार असल्याच समजत आहे. त्यामुळे उद्या महाराष्ट्राच्या या सत्ता संघर्षावर निर्णय लागू शकतो.

गेल्या अनेक महिन्यांपासून हा सत्ता संघर्षाचा पेच सुटलेला नाही. त्यामुळे आता उद्याच्या अंतिम युक्तिवादानंतर न्यायालय काय निर्णय देणार ? याकडे अवघ्या महाराष्ट्राच लक्ष लागून राहिल आहे. अर्थात हा निकाल उद्या येणार की राखून ठेवला जाईल हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे.

Share This News
error: Content is protected !!