फोनवर नमस्कार ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणण्यात गैर काय ? रावसाहेब दानवेंकडून निर्णयाचं स्वागत
आता शासकीय कार्यालयात फोन आल्यानंतर शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नमस्कार ऐवजी वंदे मातरम म्हणावं लागणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही फोनवर नमस्कार ऐवजी ‘ वंदे मातरम ‘ म्हणण्यात गैर काय ?’ असं म्हणत निर्णयाचं समर्थन केलं आहे. पाहुया रावसाहेब दानवे नेमकं काय म्हणालेत .
