वृत्तपत्रात बदनामीची धमकी; खंडणीची वसुली; महिला संपादकासह चौघा तोतया पत्रकारांना अटक

665 0

पुणे : पाच लाख रुपयांची खंडणी घेणाऱ्या एका महिला संपादकासह तोतया पत्रकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुमच्या गोदामामध्ये भेसळयुक्त अन्नधान्याची विक्री केली जाते. तुमची पेपरमध्ये बातमी लावून बदनामी करतो. अशी धमकी देऊन पाच लाखाची खंडणी मागणाऱ्या महिला संपादकासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी चौघा तोतया पत्रकारांना अटक करण्यात आली आहे.

यामध्ये प्रमोद साळुंखे,वाजिद सय्यद, मंगेश तांबे, लक्ष्मण सिंह तवर अशी अटक केलेल्यांची नावे असून योगेश नागपुरे आणि संजीवनी कदम या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, 42 वर्षीय व्यावसायिक यांचे केशवनगर येथील दत्त कॉलनी मध्ये एक गोदाम असून प्रमोद साळुंखे वाजिद सय्यद हे गोदामात आले. गोदामाच्या बाहेर मंगेश तांबे, योगेश नागपुरे, लक्ष्मण सिंह तवर हे देखील होते.

यावेळी तुम्ही गोदामामध्ये भेसळयुक्त अन्नधान्याची विक्री करून दोन नंबरचा धंदा करता. यापूर्वी गुटख्याची विक्री करून खूप पैसा कमावला. आता पेपर मध्ये बातमी लावतो. तसेच खानदानाचा खून करतो अशी धमकी देखील या तोतया पत्रकारांनी दिल्याचे समजते. फिर्यादी यांच्या मुलाला मारहाण देखील करण्यात आली. तसेच गोदामाच्या बाहेर पडण्यास अटकाव करण्यात आला. असे देखील फिर्यादी यांनी सांगितले आहे. मंगळवारी रात्री ही बाब मुंडवा पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेतला असता, चौघा पत्रकारांना या पत्रकारांना अटक करण्यात आली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!