“ही समज नाही तर अंतिम ताकीद आहे…!” मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिला ‘हा’ मोठा आदेश

517 0

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करीत असून याच पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे यांनी मनसैनिकांना एक मोठा आदेश दिला आहे.

मनसैनिकांसाठी एक पत्र जारी करत सध्या माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर जाऊन वाटेल ते बोलायचं प्रसिद्धी मिळवायची असं करणाऱ्या उथळवीरांची भरती सगळ्याच पक्षात दिसून येत आहे माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी आणि सोशल मीडियाचे लाईक्स याच्याने हे सगळे शेफारले आहेत इतर पक्षांनी अशा लोकांचं काय करावं हे त्यांनी ठरवावं पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मी हे कदापि खपवून घेणार नाही असं राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटलं आहे.

 

माझ्या पक्षातील कोणालाही पक्षांतर्गत बाबींवर काही म्हणणं मांडायचं असेल तर संबंधित नेत्यांशी बोला माझ्याशी बोला पण हे सगळं सोडून थेट माध्यमांशी बोलायचं असेल किंवा सोशल मीडियावर जाऊन गरड ओकायची असेल तर आधी राजीनामा द्या मग काय घाण करायची आहे ती करा पक्षात राहून असे प्रकार केले तर हकालपट्टी अटळ आहे असे देखील राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटलं आहे.

समज नाही तर अंतिम ताकीद आहे.

शेवटी ही समज नाही तर अंतिम ताकीद आहे म्हणत राज ठाकरे यांनी मनसैनिकांना खडे बोल सुनावले आहेत

दरम्यान मागील अनेक दिवसांपासून नाराज असलेले पुण्यातील मनसेचे माजी शहराध्यक्ष शहराध्यक्ष वसंत मोरे पुण्यातील कोअर कमिटीवर सातत्यानं नाराज असल्याचं पाहायला मिळतात त्यामुळे हे पत्र वसंत मोरे यांच्यासाठी आहे का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालीय.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!