अनेक वेळा पण प्रचंड मेहनत करत असतो पण तरीही यश पदरी पडत नाही. हातातोंडाशी आलेला घास निघून जातो, मग आपण आपल्या नशिबाला दोष देत बसतो. पण थांबा, एकदा तुमच्यातला या पाच सवयींचा बारकाईने विचार करा. त्यामध्ये बदल करा, आणि मग बघा यश हमखास तुमचेच आहे.
१. रात्री लवकर झोपणे : रात्री तुम्ही जेवढे लवकर झोपाल तितकीच लवकर तुम्हाला जाग येणार आहे. आणि तितकीच तुम्हाला शांत झोप देखील लागणार आहे. त्यामुळे तुमचा दुसरा दिवस हा ताजा तवाना आणि एनर्जीने फुल असेल.
२. सकाळी लवकर उठणे : सकाळी लवकर उठण्याची सवय ही असायलाच हवी. अर्थात अगदीच पहाटे उठावे असे देखील नाही. शरीराला पुरेशी झोप मिळाल्यानंतर सूर्योदयापर्यंत तरी उठावे. त्यानंतर अर्धा तास व्यायाम आणि अंघोळ करून कामाला सुरुवात करावी. तुमचे आहे ते काम अधिक अचूक वेळेत पूर्ण होईल.
३. नीट नेटके राहणे : आता तुम्हाला वाटत असेल की यामुळे यश कसे मिळेल तर तुमच्याकडे पाहण्याची दृष्टी समोरच्या माणसाची बदलायलाच हवी. तुम्हाला जर वाटत असेल की समोरचा वयाने, पैशाने, पदाने मोठा असला तरीही मला मान मिळावा. तर टापटीप रहा. रोज स्वच्छ आंघोळ, दात घासणे, स्वच्छ धुतलेले कपडे, विंचरलेले केस आणि डोळ्यात डोळे घालून बोलणे हे तुमचे व्यक्तिमत्व असायलाच हवे.
४. होऊन गेलेल्या गोष्टींचा विचार करणे : हा एक प्रकारचा मानसिक रोगच आहे समजा… आणि यावर तुम्हालाच मलम लावायचे आहे. जे होऊन गेले त्यावर विचार न करता जे करायचे आहे त्याच्यासाठी प्लॅन करा.
५. अधिक टेन्शन घेणे : थोडे निर्धास्त पण राहायला शिका. विनाकारण घेतल गेलेले टेन्शन तुम्हाला केवळ मानसिक थकवा देते आहे. एखाद्या नोकरीमध्ये जर तुम्हाला त्रास होत असेल तर आणखी दोन महिने अधिक त्रास सहन करा आणि तिथून बाहेर पडा. रोज उठून तोच तोच विचार करण्यापेक्षा दोन महिने आर्थिक त्रास होईल पण चांगल्या ठिकाणी नोकरी शोधा. नक्की मिळेल !