मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईतील चेंबूर येथे एका विवाहितेची गळा चिरून क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. हत्या करणारा तिचा पतीच होता. भर रस्त्यामध्ये या विवाहितेची हत्या करण्यात आली. यामागे कारण होते कि ती मुस्लिम रीती रिवाज पाळत नव्हती.बुरखा घालण्यावरून या दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते.
आरोपीचे हे तिसरे लग्न असून त्याने रूपाली नावाच्या हिंदू मुलीशी तिसरे लग्न केले. पण रुपालीने बुरखा घालण्यास विरोध केला. म्हणून त्याने तिची गळा चिरून हत्या केली. या घटनेचे पडसाद महाराष्ट्र भर पडत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी यामध्ये गांभीर्याने लक्ष घातलं आहे.
दरम्यान भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नगरसेविका आशा मराठे यांच्यासह आज चित्रा वाघ यांनी कुटुंबीयांची भेट घेतली. दरम्यान उत्तर प्रदेशच्या धर्तीवर लव्ह जिहाद कायदा महाराष्ट्रातही गरजेचा वाटतो अशी भूमिका चित्रा वाघ यांनी मंडली आहे.