बिहार : बिहारमध्ये एक दुःखद घटना समोर आली आहे. लग्न मंडपातच वरमाला घातल्यानंतर नवरदेवाला अस्वस्थ वाटू लागले आणि त्याचा दुर्दैवी अंत झाला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, सुरेंद्र कुमार याचे लग्न पार पडले. वरमाला झाल्यानंतर फोटोशूट सुरू होती. पण फोटोशूट सुरू असतानाच त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि तो बेशुद्ध पडला कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
सुरेंद्र यास डीजेच्या आवाजाचा त्रास होत होता. त्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले. डीजेचा दणदणाट बंद करावा असं देखील त्याने सांगितले. पण अखेर या जोडप्याची सुखी संसाराची स्वप्न अर्धवटच राहिली. नवरदेवाच्या अशा अचानक मृत्यूने दोन्ही कुटुंबावर प्रचंड दुःखाचा डोंगर कोसळला आहे.