जेवण बनवता येत नाही म्हणून मित्रावर चढवला थेट दगडाने हल्ला; शुल्लक कारणावरून मित्राला ठेचले

673 0

भिवंडीतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका परिसरात कापड गोदामात काम करणाऱ्या तीन मजुरांमध्ये जीवन बनवण्यावरून झालेल्या बाचाबाचीत एकानं थेट दगडाने ठेचून दुसऱ्याची हत्या केली आहे यामध्ये दीपक बर्मन याची हत्या झाली असून विजू बर्मन असं आरोपीचं नाव आहे. 

ही खळबळजनक घटना बुधवारी घडली. जेवण बनवण्यापासून तर सर्व काम एकमेकांच्या संगमतानं करत होते. परंतु बुधवारी सायंकाळच्या सुमारास पिज्यू बर्मनला दीपक बर्मनने जेवण बनवण्यास सांगितलं. मात्र पिज्यू बर्मननं जेवण बनवता येत नसल्याचं सांगत नकार दिला. जेवण बनवण्याच्या वादातून पिज्यू आणि दिपकमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि याच बाचाबाचीचं रूपांतर भांडणात झालं.

असं कसं थेट सांगू शकतो ? याचा प्रचंड राग त्याला आला होता. संतापलेल्या पिज्यूनं मागचा पुढचा कोणताही विचार न करता थेट दीपकवर दगडानं हल्ला केला. त्याच्या चेहऱ्यावर दगडानं प्रहार केले. पिज्यूनं संतापाच्या भरात दीपकच्या चेहऱ्यावर आणि डोक्यात दगडानं ठेचून त्याची हत्या केली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!