मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी 31 जुलैपासून संजय राऊत हे कोठडीत होते. त्यानंतर संजय राऊत यांच्या जामिनासाठी अनेक वेळा अर्ज करण्यात आले. आज अखेर सत्र न्यायालयाने संजय राऊत यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर ईडीच्या वकिलांनी सत्र न्यायालयात जामिनाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. मात्र ईडीची ही मागणी देखील कोर्टाने फेटाळून लावली. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जल्लोष सुरू आहे.
दरम्यान आजच संजय राऊत यांना कोठडीतून सुटका मिळू शकते. कोर्टाचे आदेश आणि कागदपत्र आर्थर रोड तुरुंगात आज वेळेत पोहोचले तर ही सुटका आजच निश्चित आहे.