SPECIAL REPORT : महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेने काय गमावलं,काय कमावलं ?

461 0

काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 7 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या भारत जोडो नुकतीच महाराष्ट्रातून मध्यप्रदेशच्या दिशेने रवाना झाली सात नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल झालेली ही यात्रा 19 नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रात होते याच दरम्यान या यात्रेने काय गमावलं आणि काय कमावलं पाहुयात या खास रिपोर्टमधून…

7 सप्टेंबरपासून कन्याकुमारीतून सुरू झालेली ही भारत जोडो यात्रा 12 राज्यातून 3500 किमी प्रवास करणार असून श्रीनगरमध्ये या यात्रेचा समारोप होणार आहे. तामिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ, कर्नाटक, तेलंगणा या 5 राज्यातून पायी प्रवास करून ही यात्रा महाराष्ट्रात पोहचली नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ बुलढाणा या जिल्ह्यातून भारत जोडो यात्रेनं प्रवास केला. याच दरम्यान 10 नोव्हेंबरला नांदेड मध्ये तर 17 नोव्हेंबरला शेगावमध्ये राहुल गांधींच्या दोन मोठ्या सभा देखील झाल्या. नांदेडला झालेल्या सभेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आदी नेते उपस्थित होते. 18 नोव्हेंबरला युवासेना प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमूख उद्धव ठाकरे यांनी मात्र या भारत जोडो यात्रेपासून लांबच राहणं पसंत केलं दरम्यान ही यात्रा सुरू असतानाच राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानं महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं. यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद देखील झाली आणि पुढे 18 नोव्हेंबरला राहुल गांधींची शेगावमध्ये जाहीर सभा देखील झाली. महाराष्ट्रातील या यात्रेत अनेक काँगेस नेत्यांनी आपल्या मुलांना राजकारणात लॉन्च करण्याचा प्रयत्न देखील केल्याचं पाहायला मिळालं यामध्ये अशोक चव्हाणांच्या कन्या श्रीजया चव्हाण, काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरातांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांचा समावेश होता. आता ही यात्रा महाराष्ट्रातून मध्यप्रदेशच्या दिशेने जाणार असून या दरम्यान एक दिवस गुजरात विधानसभा प्रचारासाठी राजकोटमध्ये जाणार आहेत. आणि त्यानंतर पुन्हा भारत जोडो सहभागी होणार आहेत

ही यात्रा राजकीय फायद्यासाठी नसून एकसंध देशासाठी असल्याचं काँग्रेस नेते जरी सांगत असले तरी या आगामी काळात या भारत जोडो यात्रेचा काँग्रेसला कसा फायदा होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल..

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!