शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मुलुखमैदानी तोफ अशी ओळख असलेल्या संजय राऊत यांचा आज 61 वा वाढदिवस याच निमित्तानं त्यांच्या कारकीर्दीचा आढावा घेणारा TOP NEWS मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट
संजय राऊत यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९६१ रोजी अलिबागमध्ये झाला. त्यांनी वडाळ्याच्या आंबेडकर महाविद्यालयातून बी.कॉमची पदवी घेतली. संजय राजाराम राऊत असं त्याचं पूर्ण नाव संजय राऊत यांच्या करिअरची सुरूवात राजकारणातून नाही तर पत्रकारितेतून झाली होती. लोकप्रभा साप्ताहिक ते सामनाचे कार्यकारी संपादक असा त्यांचा पत्रकारितेतला प्रवास आहे. पहिल्यांदा राऊत हे ‘लोकप्रभा’ या साप्ताहिकात काम करायचे.
तिथं ते क्राईम रिपोर्टर म्हणून काम पाहत असत. तिथं त्यांनी अनेक सनसनाटी बातम्या केल्या होत्या. त्यावेळी आपल्या लेखांमधून ते शिवसेनेच्या भूमिकेशी मिळतीजुळती भूमिका घेत असल्याचं बाळासाहेब ठाकरेंना वाटत होतं. 1989 ला सामना सुरू झाला तेव्हा अशोक पडबिद्री कार्यकारी संपादक होते. त्यांच्यानंतर संजय राऊत 1993 ला कार्यकारी संपादक पदावर रुजू झाले.”
क्राईम रिपोर्टर म्हणूनही संजय राऊत यांनी स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. या काळात त्यांनी अनेक सनसनाटी बातम्यांचे वृत्तांकन केले होते. या काळात संजय राऊत बाळासाहेब ठाकरे यांच्या नजरेत भरले. संजय राऊत यांची भूमिका शिवसेनेशी मिळतीजुळती असल्याचे बाळासाहेबांना वाटायचे. त्यामुळे दैनिक सामना सुरु झाल्यानंतर बाळासाहेबांनी संजय राऊत यांना बोलावून घेतले. 1989 ला सामना सुरू झाला तेव्हा अशोक पडबिद्री कार्यकारी संपादक होते. त्यांच्यानंतर संजय राऊत 1993 ला कार्यकारी संपादक पदावर रुजू झाले. सध्या संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार असून सलग तीन वेळा ते शिवसेनेच्या तिकिटावर राज्यसभेत निवडून गेले.
२०१९ च्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर जे निकाल लागले त्यात महायुतीला १६० हून अधिक जागा मिळाल्या होत्या. मात्र सर्व काही समसमान वाटप ठरलं आहे त्यामुळे मुख्यमंत्रीपदही भाजपने अडीच अडीच वर्षे वाटून घ्यावं असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. तसंच मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार ही भूमिका त्यांनी लावून धरली. या सगळ्यातून महाविकास आघाडीचा जन्म झाला. महाविकास आघाडीचे दोन प्रमुख शिल्पकार मानले जातात. एक आहेत शरद पवार तर दुसरे आहेत ते संजय राऊत. या दोघांमुळेच महाऱाष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं.
उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यात संजय राऊत यांचा सिंहाचा वाटा आहे. एवढंच नाही तर शिवसेनेवर जेव्हा जेव्हा संकट आलं किंवा जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे अडचणीत येत आहेत असं वाटलं तेव्हा विरोधकांवर तुटून पडण्याचं काम आणि ती जबाबदारीही संजय राऊत यांनी नेटाने सांभाळली. संजय राऊत यांची ओळख भाषणांच्या आधी, शिवसेनेतल्या मेळाव्यांमध्येही मुलुखमैदानी तोफ अशीच केली जाऊ लागली.