पुणे : समृद्धी महामार्गावर अनेक अपघात (Buldhana Bus Accident) झालेत. सातत्याने अपघात (Buldhana Bus Accident) होतात हे गेले काही महिने बघायला मिळतं. मी त्या रस्त्याने गेलो होतो.तिथे लोकांना त्यांचा अनुभव विचारला. लोक म्हणाले सातत्याने अपघात बघायला मिळतात.जो अपघातात मृत्यू पावतो तो देवेंद्रवासी होतो असे लोक सांगतात.त्याचे कारण रस्त्याचे काम शास्त्रीय पद्धतीने झालेले नसावे. ज्यांनी रस्त्याचे नियोजन केलं, तो तयार केला त्यांना ते लोक दोषी ठरवतात. जे झाले ते वाईट झाले. 5 लाख मदत देऊन प्रश्न सुटत नाहीत. असे अपघात पुन्हा होऊ नये यासाठी तज्ज्ञ लोकांची समिती तयार करावी. त्यांनी रस्त्याची कमतरता शोधून काढावी. रस्त्यावर खुणा बघायला मिळत नाहीत. सलग रस्ता आहे. त्यामुळे वाहन चालवताना काही गोष्टी लक्षात येत नाही असे काही लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे नीट अभ्यास होणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.
अनेकांचे शाप आणि अश्रू त्या रस्त्यामध्ये दिसतात”, समृद्धीवरील अपघातावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
काय घडले नेमके?
आज पहाटेच्या सुमारास (Buldhana Bus Accident) सिंदखेड राजा तालुक्यात गौ शिवारात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर नागपूरकडून पुण्याच्या दिशेने असलेल्या विदर्भ ट्रॅव्हल क्र. MH29 BE1819 ला भीषण अपघात (Buldhana Bus Accident) होऊन आग लागल्यानं मोठया प्रमाणावर जीवितहानी झाली. यामध्ये 26 प्रवासी मृत्युमुखी पडले. बस मध्ये एकूण 33 जण प्रवास करत होते. नागपूरहून पुण्याला ही खाजगी बस जात होती. बुलढाण्यातील सिंखेडराजा जवळ परिसरात या बसला अपघात झाला.या अपघातातून ड्रायव्हर मात्र वाचला आहे.
RTO कडून अहवाल सादर
या अपघाताप्रकरणी आरटीओकडून प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात आणि बसच्या चालकाने दिलेल्या जबाबात तफावत असल्याचे समोर आले. ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार टायर फुटून भीषण अपघात झाला. मात्र आरटीओनं दिलेल्या अहवालात बसचा टायर फुटलाच नाही अशी माहिती समोर आली आहे. टायर फुटल्याने हा अपघात झालाच नाही. हा अहवाल अमरावतीच्या आरटीओने सादर केला आहे.