… तेव्हा औरंगजेब होता आता दुसरे कोणी आहेत काय म्हणाले संजय राऊत ?

414 0

मुंबई : आजही आम्ही दिल्लीपुढे झुकणार नाही शरण जाणार नाही.कुणी महाराष्ट्राला कमजोर समजत असेल तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पहावा असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

संजय राऊत म्हणाले,त्या काळात देखील महाराष्ट्रातले फितूर आणि गद्दार औरंगजेबाला मदत करत होते आजही तसेच फितूर आणिबे बेईमान दिल्लीला मदत करत आहेत आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर घाव घालत आहेत.कोणी महाराष्ट्राला कमजोर समजत असेल तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पहावा हा सह्याद्री आहे हीमालयाच्या बरोबरीने लढत राहील त्यांना महाराष्ट्रापेक्षा दिल्लीच्या तख्तावर बसलेले महाराष्ट्र द्रोही मराठी भाषेचे शत्रू त्यांना मुंबईमध्ये महाराष्ट्रमध्ये शालेय शिक्षणामध्ये मराठी भाषेला विरोध केला कोर्टात केले त्यासाठी असे लोक इथले औरंगजेबाचे इथले हत्यार आहेत ते दिल्ली चे तक्त घेऊन उभे आहेत पण हे तक्त फोडण्याची ताकद आमच्या कडे आहे. .

Share This News
error: Content is protected !!