या चिमुकल्याचे मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र वाचून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही !

787 0

हिंगोली : बळीराजाचं आयुष्य हे मेहनतीतच जास्त जाते आहे. त्यात निसर्गाची अवकृपा सर्वात जास्त बळीराजालाच धक्का देऊन जाते. पोटच्या लेकराला अन्न मिळत नाही ,जगाच्या पोशिंद्याला जेव्हा स्वतःच्याच लेकराला पोटभर खायला देता येत नाही तेव्हा त्या बापाची गत काय होत असेल हे देखील या पत्रातून समजू शकतो.

आईने दसऱ्याला पोळ्या केल्या नाहीत, बाबांना पैसे मागितले तर आई म्हणाली बाबांना पैसे मागू नको… शेजारच्या गावातल्या एका शेतकऱ्याच्या मुलांना पैसे मागितले म्हणून त्या शेतकऱ्यांन आत्महत्या केली. आणि मग बिचार्या त्या चिमुकल्यान घाबरून बापाला पैसे मागणं बंद केलं.

मुख्यमंत्री साहेब अनुदानाचे पैसे लवकर पाठवा, आई म्हणाली पैसे आले की पोळ्या करीन, मग दिवाळी आली की आई पोळ्या करते … तेव्हा तुम्ही पण या पोळ्या खायला… असं भाबड आमंत्रण या लेकरांन थेट मुख्यमंत्र्यांनाच दिला आहे.
वाचा ते पत्र…

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!