shaktikanta Das

RBI चा कर्जदारांना दिलासा; रेपो रेटमध्ये कोणतीही वाढ नाही, गव्हर्नर शक्तिकांत दास यांची घोषणा

504 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कर्जदारांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. यामध्ये आरबीआयने रेपो रेटमध्ये (Repo Rate) कोणताही बदल केला नसून रेपो रेट 6.50 टक्क्यांवर कायम राहणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे व्याजदर जैसे थे राहणार आहेत.

आरबीआयने जाहीर केले नवे पतधोरण
आरबीआयकडून आज पतधोरण जाहीर करण्यात आले आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीकडून अपेक्षेप्रमाणे सलग दुसऱ्यांदा व्याजदरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. रेपो रेट 6.50 टक्के कायम ठेवण्याचा निर्णय आरबीआयच्या पतधोरण समितीकडून घेण्यात आला आहे. मागील वर्षात 2.50 टक्क्यांनी आरबीआयनं वाढ करत रेपो रेटमध्ये बदल केले होते.

महागाईत भर पडण्याची शक्यता
भारतीय हवामान विभागाकडून मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे खरीप हंगाम कसा असेल याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. मान्सूनची अनिश्चितता, साखर, तांदूळ आणि क्रूड तेलाच्या किंमती यामुळे महागाईमध्ये (Inflation) भर पडण्याची शक्यता आहे.

महागाई दर 2023-24 मध्ये 5.1 टक्के राहण्याचा अंदाज
पहिल्या तिमाहीत 4.6 टक्के
दुसऱ्या तिमाहीत 5.2 टक्के
तिसऱ्या तिमाहीत 5.4 टक्के
चौथ्या तिमाहीत 5.2 टक्के महागाई दर राहण्याचा अंदाज

रेपो रेट म्हणजे काय?
रेपो रेट (Repo Rate) म्हणजे, ज्या दरावर रिझर्व्ह बँक इतर बँकांना कर्ज (Loan) देते. तर रिव्हर्स रेपो रेट म्हणजे, ज्यावर रिझर्व्ह बँक पैशांच्या ठेवींवर व्याज देते. रेपो रेट वाढल्याने सर्व प्रकारची कर्ज महाग होतात.

रेपो रेटचा थेट बँकेच्या कर्जावर परिणाम
रेपो रेटमुळे थेट बँकेच्या कर्जावर परिणाम होतो. जेव्हा रेपो रेट कमी होतो, तेव्हा कर्ज स्वस्त होते आणि ज्यावेळी रेपो रेट वाढतो, त्यावेळी बँका देखील त्यांचे कर्ज महाग करतात. याचा परिणाम होम लोन (Home Loan), ऑटो लोन (Auto Loan), पर्सनल लोन (Personel Loan) अशा सर्व प्रकारच्या कर्जांवर होतो.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!