सध्या सुरू असणाऱ्या सततच्या पावसाचा मोठा फटका केरळमधील वायनाडला बसला असून या ठिकाणी चार वेगवेगळ्या ठिकाणी भूस्खलन होऊन त्यात मुंडक्काई चुरामल्ला अट्टामाला आणि नुलपूझा विचार गाव होत्याची नव्हती झाली आहेत घरं, पूल,रस्ते सर्वच ढिगार्याखाली दबलं असून आतापर्यंत. दीडशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
30 जुलै 2014 ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील माळीणमध्ये झालेल्या महाप्रलयात 151 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. याच घटनेची पुनरावृत्ती दहा वर्षांनी 30 जुलै 2024 मध्ये केरळ राज्यातील वायनाड मध्ये घडली असून या ठिकाणी झालेल्या भूस्खलनात दीडशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून बेपत्ता नागरिकांचा आकडा 98 पर्यंत पोहोचला आहे. अनेक जण ढिगार्याखाली अडकल्यानं मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली. निसर्गरम्य व नयनरम्य ठिकाण म्हणून ओळखल्या जात असणाऱ्या या गावांचं दळण आणि पुरामुळे संपूर्ण चित्रच बदलून गेलं आहे. या भूस्खलनाची नेमकी कारणं काय आहेत पाहूयात…
वायनाड हे केरळ मधील एकमेव पठारी क्षेत्र आहे
पश्चिम घाटात 700 ते 2100 मीटर उंचीवर पठार आहे
वायनाडमधील 51 टक्के जमीनही डोंगर-उताराची आहे
दरम्यान देशात या अगोदर कुठे दरड कोसळण्याच्या भीषण घटना घडल्या व या घटनांमध्ये किती जण मृत्युमुखी पडले पाहूयात
1948 मध्ये आसामच्या उत्तर पूर्व भागात दरड कोसळण्याची घटना घडली होती यामध्ये 500 जणांचा मृत्यू झाला होता.
4 ऑक्टोबर 1968 मध्ये दार्जिलिंग मध्ये दरड कोसळण्याची घटना घडली होती या घटनेत 1000 जणांचा मृत्यू झाला होता
18 ऑगस्ट 1998 मध्ये उत्तराखंड मधील मालपा शहरात दरड कोसळण्याची घटना घडली होती ज्यामध्ये 300 जणांचा मृत्यू झाला होता.
12 जुलै 2000 मध्ये मुंबईतील घाटकोपरमध्ये दरड कोसळली होती या घटनेत 67 जणांचा मृत्यू झाला होता
16 जून 2013 ला उत्तराखंड मधील केदारनाथ या ठिकाणी भूस्खलनाची घटना घडली होती या घटनेत 5700 जणांचा मृत्यू झाला होता
30 जुलै 2014 ला पुणे जिल्ह्यातील माळीण मध्ये भूस्खलनाची घटना घडली होती या घटनेत 151 जणांचा मृत्यू झाला होता
19 जून 2023 ला रायगड मधील इर्शाळगड या ठिकाणी भूस्खलनाची घटना घडली होती या घटनेत 26 जणांचा मृत्यू झाला होता.
केरळच्या वायनाड मधील दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाईकांना मदत देखील जाहीर केली आहे याबरोबरच वायनाडचे माजी खासदार लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी व प्रियांका गांधी यादेखील घटनास्थळाला भेट देणार असून केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी सर्व शासकीय यंत्रणांना मदतीसाठी पाठवून घटनास्थळी अन्नधान्याचा पुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत.