मुंबई : आपल्या आजूबाजुला H3N2 चे रुग्ण वाढताना दिसत आहे. त्यामुळे मास्क लावण्यासंदर्भात ‘टास्क फोर्स’ चे काय म्हणणे आहे. या संदर्भातील निवेदन गुरुवारी विधान परिषदेत सादर करावे, असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिले.
आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सन्माननीय सदस्यांकडून आरोग्य विषयक प्रश्न विचारण्यात आले. त्याला उत्तरं देण्याकरिता वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे दोघेही उपस्थित होते.
सध्या राज्यात H3N2 रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याची दखल घेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात उपस्थित असलेल्या वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि आरोग्यमंत्री यांचे लक्ष वेधले.
यावेळी त्या म्हणाल्या, H3N2 च्या वाढत्या प्रभावामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. मास्क फक्त रुग्णांनीच लावायचा आहे का सर्वांनीच लावायचा आहे. यासर्व परिस्थितीबाबत टास्क फोर्स चे काय म्हणणे आहे. त्याचे निवेदन सरकारच्या वतीने सभागृहात येत्या गुरुवारी २३ मार्च पर्यंत सादर करावं.
यावर आरोग्य मंत्री मा. श्री. तानाजी सावंत यांनी अहवाल सादर केला जाईल असे सांगितले.