Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या सत्तेचा सारीपाठ रंगला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने वकिलांनी जबरदस्त युक्तिवाद करून एकमेकांच्या मुद्द्यांना चुकीचा ठरवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. दोन्हीही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयामध्ये 4 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे दरम्यान दोन्हीही बाजूच्या वकिलांनी आज केलेल्या युक्तीवादातील महत्त्वाचे मुद्दे ;
ठाकरे गटाचे वकील
- शिंदे गटाला स्वतःला मूळ पक्ष म्हणता येणार नाही ते पार्टीतून बाहेर पडले आहेत आणि इलेक्शन कमिशन समोर त्यांनी हे मान्य केलं आहे.
- पक्षाची बैठक बोलावली असताना गुवाहाटी ,सुरतला जाणे पक्षाच्या विरोधात जाऊन व्हिप नेमणे अधिकृत व्हिपच्या निर्देशांच्या विरोधात जाऊन मतदान करणे अशा शिंदे गटाच्या आचरणावरून शिंदे गटाने शिवसेना सोडल्याचे प्रतीत होते. त्यामुळे शेड्युल 10 अंतर्गत हे सर्व बेकायदेशीर आहे .
- त्यामुळे शिंदे गटाने नवीन सभापती नेमणे व्हिप नेमणे सरकार बनवणे आणि निर्णय घेणे हे सर्वच बेकायदेशीर आहे .
- या गटाकडे आता केवळ कोणत्याही एका पक्षात सामील होण्याचा पर्याय आहे
शिंदे गटाचे वकील
- ज्या नेत्याकडे बहुमतच नाही तो पक्षांतर बंदीच्या कायद्याचा उपयोग करून इतर सदस्यांना डांबून ठेवू शकत नाही .
- आम्ही पक्ष सोडलेला नाही पक्षांतर्गत लोकशाही असली पाहिजे. आम्हाला मुख्यमंत्री वेळ देत नव्हते ,म्हणून आम्हाला नेता बदलायचा आहे.
- शिवसेनेत सध्या दोन गट आहेत जसे 1969 मध्ये काँग्रेसमध्ये झाले होते.
- मुख्यमंत्री फ्लोअर टेस्टमध्ये पराभूत झाले . म्हणून नवीन सरकार आलेले नाही . तर त्यांनी राजीनामा दिला होता म्हणून आम्हाला सरकार स्थापन करावं लागलं .
- मागील सरकारने एक वर्षापेक्षा जास्त काळ सभापतीचे निवडला नाही नवीन सरकारने सभापती निवडणे आवश्यक आहे. असे राज्यघटनेने नमूद केले आहे . त्यामुळे आम्ही नवीन स्पीकर सुद्धा निवडले.