Jalgaon

काम आटोपून घरी परतताना बांधकाम कामागाराचा रेल्वेच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू

574 0

जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये काम आटोपून घराकडे परतणाऱ्या एका बांधकाम कामागाराचा रेल्वे रुळ ओलांडतांना रेल्वेच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राजू किसन पवार (वय 40, रा. चितोड जि.धुळे ह.मु. हनुमान नगर, जळगाव) (Raju Kisan Pawar) असे अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात (Ramanandnagar Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

काय घडले नेमके?
जळगाव शहरातील वाघ नगर परिसरातील हनुमान नगरात मृत राजू पवार हे आपल्या पत्नी आणि मुलासह राहत होते. ते काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. घटनेच्या दिवशीदेखील रात्री 8 वाजेच्या सुमारास पिंप्राळा येथे काम आटोपून ते घरी परतत होता. यादरम्यान रेल्वे रूळ क्रॉस करत असताना धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोलीस नाईक हर्षल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला आणि मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. या घटनेमुळे पवार कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत राजू पवार यांच्या पश्चात पत्नी मिनाबाई, मुलगा सुनिल, एक भाऊ आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!