T20 World Cup मध्ये भारताचा इंग्लंडकडून दारुण पराभव; क्रिकेट प्रेमींची निराशा

511 0

T20 World Cup 2022 : T20 World Cup मध्ये भारताचा अक्षरशः दारुण पराभव झाला आहे. क्रिकेट प्रेमींना भारतीय संघाकडून प्रचंड अपेक्षा होत्या. पण या सामन्यामध्ये इंग्लंडने भारतावर दहा विकेट्सन विजय मिळवला आहे. त्यामुळे आता फायनल्स मधून टीम इंडिया बाहेर झाली आहे.

अर्थात हा एक खेळ आहे. भारत 2007 पासून t20 वर्ल्ड कपच्या विजेते पदाची प्रतीक्षा करतो आहे. भारताची ही हार केवळ क्रिकेट प्रेमींच्याच नाही तर क्रिकेटपटूंच्या देखील तेवढीच जिव्हारी लागली आहे. एका व्हिडिओमध्ये रोहित शर्माला अश्रू अनावर झाल्याच देखील पाहायला मिळालं.

यावेळी रोहित शर्मा म्हणाला की, “मी खूप निराश आहे. आम्ही खूप मेहनतीने स्कोर उभा केला. पण आम्ही चांगली गोलंदाजी केली नाही. नॉकआउटचं प्रेशर तुम्ही कसं सांभाळता त्यावर बरच काही अवलंबून असतं. शांत राहण्याची गरज होती. आम्ही सुरुवातीलाच घाबरत होतो.” असं यावेळी रोहित म्हणाला आहे.

त्यासह इंग्लंडच्या ओपनर्सना देखील श्रेय द्यावा लागेल असं देखील तो म्हणाला आहे. इंग्लंडने मोठा विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केलाय. आता येत्या रविवारी मेलबर्नमध्ये इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये फायनल मॅच पाहायला मिळेल.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!