तुम्हीही नेहमी ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी वाचाच; रेल्वे मंत्र्यांनी केली मोठी घोषणा !

512 0

ट्रेनने प्रवास करताना आत्तापर्यंत तुम्हाला वेगवेगळा अनुभव आला. यामध्ये तिकीट रद्द केल्यावर पैसे कापले जाणे किंवा तासंतास उशिराने येणाऱ्या गाड्या खरंतर यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते. पण आता रेल्वे प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या वतीने महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये बराच वेळा ट्रेन लेट झाल्यामुळे प्रवासी तिकीट रद्द करतात. पण अशावेळी त्यांचे पैसे कापले जातात. तर आता यापुढे असं होणार नाही.

हिवाळ्यामध्ये अनेक वेळा धुकं असल्याकारणाने गाड्या तासंतास उशिराने धावत असतात. अशावेळी आता प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे अनेक सुविधा देणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या सर्व सुविधा मोफत असणार आहेत. तर तुम्ही जर तिकीट रद्द केलं तर तुम्हाला पूर्ण परतावा देखील मिळणार आहे.

कोणत्याही कारणाने जर तुमची ट्रेन तीन तास किंवा त्याहून अधिक उशिरा आली तर प्रवासी तिकीट रद्द करू शकतात आणि याचा पूर्ण परतावा तुम्हाला मिळू शकणार आहे. कन्फर्म तिकीटा व्यतिरिक्त आरएसी तिकिटावर देखील पूर्ण परतावा दिला जाणार आहे. तसेच जेवणाची देखील सोय उपलब्ध असणार आहे.

Share This News
error: Content is protected !!