ऋतुजा लटकेंना उच्च न्यायालयाचा दिलासा : उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत राजीनामा मंजूर करा; मुंबई महापालिकेला आदेश

234 0

मुंबई : अंधेरी पोट निवडणुकीतील ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत लटके यांना राजीनामा स्वीकारल्याचे पत्र द्या असे आदेश हायकोर्टाने मुंबई महापालिकेला दिले आहेत.

न्यायालयाच्या निकालामुळे ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी लटके उद्या ठाकरे गटातर्फे उमेदवारी अर्ज भरतील अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे.

ऋतुजा लटके यांचा राजीनामा पालिकेने मंजूर न केल्यामुळे लटके यांना अंधेरी पोट निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरता येत नव्हता. त्यामुळे मुंबई पालिके विरोधात ठाकरे गटाने हायकोर्टात धाव घेतली होती .

आज या प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठाकडे सुनावणी झाली ऋतुजा लटके यांच्यातर्फे ऍड. विश्वजीत सावंत तर मुंबई पालिकेतर्फे ऍड. अनिल साखरे यांनी बाजू मांडली आहे. त्यामुळे आता लटकेंचा निवडणुकीसाठीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Share This News
error: Content is protected !!