बंगळुरू : बंगळुरूमध्ये एक विक्षिप्त घटना समोर आली आहे. पोटच्या मुलांनच आपल्या वडिलांची संपत्तीसाठी एक कोटीची सुपारी देऊन त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार, आरोपी मनीकांता याने 2013 मध्ये आपल्या पहिल्या पत्नीची हत्या केली होती. यावरूनच त्याचे त्याच्या वडिलांशी वाद होते. त्यानंतर 13 फेब्रुवारीला त्याने वडिलांना संपवण्यासाठी मारेकरी पाठवून त्यांची देखील हत्या केली. पी. एन. नारायण स्वामी हे त्यांच्या अपार्टमेंट जवळच उभे असताना दोघा मारेकऱ्यांनी येऊन त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला, याप्रकरणी पी. एन. नारायण स्वामी यांच्या पत्नीने फिर्याद नोंदवली.
सुरुवातीला मनीकांता हाच एक साक्षीदार होता. परंतु मनीकांताची गुंड प्रवृत्तीची पार्श्वभूमी असल्याकारणाने पोलीस त्याच्यावर नजर ठेवून होते. 2020 साली मनीकांता हा निर्दोष सुटला होता. त्यानंतर त्याने अर्चना या दुसऱ्या महिलेशी विवाह केला. या आरोपीचे कॉल रेकॉर्ड्स तपासले असता, तपासांती या मनीकांताला पोलिसांनी ताब्यात घेतले.
अधिक चौकशी त्याच्याकडे केली असता, तुरुंगात असताना त्याची दोन कॉन्ट्रॅक्ट किलरची ओळख झाली होती. यामध्ये शिवकुमार आणि आदर्श याच दोघांना त्यांन वडिलांच्या हत्येची सुपारी दिली होती. थोडी थोडकी नाही तर एक कोटी रुपयांची सुपारी त्यान या दोघांना देऊ केली. त्यानुसार या दोघांनी मनीकांता याच्या वडिलांवर पाळत ठेवून घराजवळच त्यांची हत्या केली.
धक्कादायक म्हणजे मनीकांता याने लग्न केलेली त्याची दुसरी बायको नांदायला तयार होत नव्हती. मनीकांता याचे अन्य महिलांशी देखील संबंध असल्याचा आरोप करून तिने घर सोडण्याची धमकी दिली होती. यावेळी मनीकांताने एक प्लॉट, फ्लॅट आणि 15 लाख कॅश त्याचबरोबर जमीन देखील तिला देण्याचा आश्वासन दिलं होतं. यावरूनच वडिलांचं आणि मनीकांताचे वाद संपत नव्हते. संपत्ती देणार नाही असं म्हटल्यानंतरच मनी कांताने वडिलांच्या हत्येची सुपारी दिली होती.