रात्री शांत झोप न लागणे हा आजच्या जगामधला सर्वात सामान्य त्रास आहे. पण तो जितका सामान्य त्रास आहे, तितकाच घातक देखील आहे. कारण जर तुमची पुरेपूर शांत झोप झाली नाही. तर अनेक आजारांना तुम्हाला सामोरं जावं लागू शकते. चला तर मग आज काही असे उपाय पाहूयात, ज्या अगदी सर्व सामान्य उपायांमुळे तुम्हाला नक्की शांत झोप मिळेल आणि संपूर्ण दिवसभर तुम्ही ताजेतवाने राहाल.
१. अगदी आज पासून रात्रीचे हलके जेवण रात्री आठ वाजताच घ्या. त्यानंतर मोजून शंभर पावलंच चालायचं आहे. म्हणजेच शतपावलीच करायची आहे. दहा वाजता मोबाईल न पाहता किंवा टीव्ही न पाहता बिछान्यावर डोळे मिटून पडून राहायचा आहे.
२. पहिल्या दिवशी तुम्हाला झोप लागणार नाही हे नक्की, पण आजपासून तुम्हाला सुरुवात नक्की करायची आहे.
३. झोपताना एखादी चांगले पुस्तक वाचायचे. भलेही एकच पण वाचायचे. पण ते पुस्तक चांगले , सकारात्मक विचारांचे असावे . जसेकी एखादी लव्ह स्टोरी , मोटिव्हेशनल स्टोरी वाचावी. क्राईम स्टोरी, भुताची किंवा गुढ कथा असं काहीही वाचू नका.
४. हे झालं रात्री काय करायचं याविषयी, आता सकाळचा अलार्म लावायचा आहे. तो पूर्ण आठ तासाच्या झोप घेतल्यानंतरचा… अर्थात जर तुम्ही दहा वाजता बिछान्यावर अंग टाकणार आहात, तर सकाळी सहा वाजताचा तरी अलार्म तुम्हाला लावायचाच आहे. सर्वात महत्त्वाचे मोबाईलवर अलार्म लावून उशी खाली न ठेवता तुमच्या पासून कमीत कमी दहा पावलं लांब ठेवा. म्हणजे तुम्हाला उठून दहा पावलं चालून अलार्म बंद करावा लागेल. इथेच तुम्हाला तुमच्या मनावर ताबा मिळवायचा आहे.
५. आता सकाळी उठल्यानंतर सकाळचा भर पेठ नाश्ता, अर्धा तासाचा व्यायाम, पंधरा मिनिटे मेडिटेशन आणि पंधरा मिनिटे मॉर्निंग वॉक यासाठी तुम्हाला द्यायचेच आहेत. यामुळे तुमच्या शरीरामधली मरगळ दूर होईल. मनावर ताबा मिळवण्यास मदत मिळेल ,आणि दिवस ताजातवाना जाईल.
६. झोपेचे चक्र अचानक बदलल्यामुळे तुम्हाला दुपारी हमखास झोप येण्याची शक्यता आहे. पण पुन्हा एकदा तुमची महत्त्वाची परीक्षा इथेच असणार आहे. दुपारी झोपू नका, सुरुवातीचा त्रास टाळण्यासाठी तुम्ही वामकुक्षी घेऊ शकता, जी केवळ पंधरा मिनिटाची जास्तीत जास्त असावी. जर तुम्ही दुपारी झोपला नाही तरच पुन्हा रात्री लवकर झोप येण्यासाठी तुम्हाला मदत होईल. आणि तुमचे रात्रीचे झोपेचे चक्र सुरळीत होण्यास मदत होईल.
७. बिछाना रोज रात्री स्वच्छ तयार करा. अंगावर घेण्याचा रग नेहमी स्वच्छ आणि चांगला वास राहील असाच ठेवा. तसेच बेडशीट आणि उशीचा देखील चांगला वास येईल याची काळजी घ्या. वेळोवेळी ते बदलत राहा.
८. रात्री झोपताना तळ पायाला खोबऱ्याच्या तेलाने मसाज केल्यास खूप चांगला परिणाम मिळेल. तुम्ही डोक्यावर देखील काही मिनिटे मसाज करू शकता.
९. जर तुम्ही नोकरी करत असाल तर झोपताना डोळ्यावर गुलाब पाण्याच्या थंडगार कापसाच्या पट्ट्या ठेवा.
१०. झोपताना दिवसभराचा आढावा नक्की घ्या, ती मेंदूची नैसर्गिक प्रक्रिया असते. पण जी गोष्ट तुमच्या मनावर दडपण वाढवते तिचा विचार प्रयत्नपूर्वक मनातून काढून टाका.