शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबत विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं देखील कमी करण्यासाठी सध्या शिक्षण खातं काही योजनांचा विचार करते आहे. त्यात एक सकारात्मक माहिती समोर आली आहे की, विद्यार्थ्यांना आतापर्यंत पुस्तक मोफत मिळत होती. आता त्यासह वह्या देखील मोफत मिळणार आहेत.
त्यासह विद्यार्थ्यांना चांगल्यातले चांगले शिक्षण देण्यासाठी पालक सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळे विषय अभ्यासक्रम आणले देखील जातात पण या सर्वांमध्ये विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं देखील मोठ्या प्रमाणात वाढलं. आणि ही नवीन चिंता पालकांना सतावू लागली. यावर आता शालेय शिक्षण विभागानं एक निर्णय घेतला आहे.
शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांमध्येच एक कोर पान लावून देण्यासह मोफत वह्या देखील देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याविषयी माहिती दिली. सरकार शालेय विद्यार्थ्यांचं ओझं कमी करण्याच्या तयारीत आहे. यासाठी पुस्तकांमध्येच कोरी पान अशी लावता येतील किंवा नोट्स काढताना पुस्तकांमध्येच कशा पद्धतीने काढता येतील याचे देखील नियोजन सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.