“भाजप,मनसे हे आमचे जुने सहकारी,त्यांनी साधी विचारपूसही केली नाही…!” वाचा संजय राऊत यांनी ‘का’ केले असे ट्विट

326 0

मुंबई : सुमारे तीन महिने तुरुंगात राहिल्यानंतर संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला. त्यानंतर अनेकांनी त्यांची स्वतः भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तर अनेकांनी फोन करून त्यांची खुशाली विचारली त्यामध्ये नेमकं जुन्या सहकाऱ्यांनी साधी विचारपूस देखील केली नाही. असा खेद संजय राऊत यांनी व्यक्त केला. 

तर झाले असे की, भारत जोडो यात्रेवर असताना राहुल गांधी यांनी स्वतः संजय राऊत यांना फोनवरून तब्येतीची विचारपूस केली. याबद्दल संजय राऊत यांनी ट्विट करून आभार देखील त्यांचे व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले आहेत की,  “सध्या राजकारणात किती कडवटपणा आला आहे हे आपल्याला माहित आहे. राहुल गांधींचा फोन म्हणजे अशा कडवटपणात एक प्रेमाची झुळूक म्हणता येईल. 102 दिवसानंतर मी तुरुंगातून बाहेर आल्यावर किती लोकांनी माझी चौकशी केली याची मला माहिती आहे. माझा पक्ष ठाकरे, कुटुंबीयांनी त्याचबरोबर पवार कुटुंबीयांनी देखील माझी चौकशी केली मात्र भाजप, मनसे हे माझे जुने सहकारी त्यांनी साधी विचारपूसही केली नाही. अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

त्याचबरोबर त्यांनी भाजपवर टीका देखील केली आहे. ती म्हणजे राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत वक्तव्य केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने घेतलेली विरोधी भूमिका आणि राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शांत राहण्याची घेतलेली भूमिका अर्थात ते म्हणाले आहेत की, “भाजप आणि आमच्यात हाच फरक आहे. आम्ही राहुल गांधींनी सावरकरांबाबत जे वक्तव्य केलं त्याबाबत थेट भूमिका घेतली. पण राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजूनही शांतच आहेत अशी टीका त्यांनी केली आहे.”

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!