पुणे : सर्वात आधी घडलं ते एकनाथ शिंदे यांचं बंड नाट्य … त्यानंतर सत्ता स्थापनेचा पेच सुटतो न सुटतो तोच सुरू झाला मंत्रिमंडळ स्थापनेचा प्रश्न … आता तोही प्रश्न सुटत असल्याच दिसत असतानाच मनासारखं खातं मिळालं नाही , म्हणून शिंदे गटातील काही मंत्री नाराज असल्याचं समोर येत आहे. यामुळेच आता राजकीय वर्तुळातून टीकाटिप्पणी होते आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या नाराज मंत्र्यांवर एक मिश्किल टिप्पणी केली आहे. यावेळी त्या म्हणाल्या की , ” बायको जेवढी घरात फुगत नसेल तेवढे मंत्री फुगत आहेत . आज-काल नेत्यांचे मोबाईल नॉट रिचेबल येतात. हे देखील हास्यास्पद आहे. नेत्यांचा फोन हा सदैव रिचेबल असायला हवा . तुमच्याकडेही मोबाईल नॉटरीचेबल वाली पद्धत काय सुरू झाली आहे ,असं मला आजकाल दिल्ली वाले विचारतात…! ” असे देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे .