अर्रर्र .! गंध गुलाल लावून तिरडी माझी सजवा, त्यावर टाकायची फुलं दारूत आधी भिजवा ! वडिलांची अशी होती शेवटची इच्छा, मुलांनीही केली पूर्ण, वाचा ही अजब बातमी

959 0

उत्तर प्रदेश : आज-काल खरंच काय होईल हे सांगणं कठीण झालंय. आता एक घटना समोर येते आहे. उत्तर प्रदेश मधून… उत्तर प्रदेश मधील संबळ जिल्ह्यातील हलू सराय असं या गावाचं नाव आहे. या गावात राहणारे 65 वर्षीय गुलाब सिंह यांना दारू पिण्याची सवय होती. याच दारूच्या सवयीन त्यांचा जीवही घेतला. 8 मार्चला अति दारू प्यायल्यामुळे त्यांचं निधन झालं. तर त्यानंतर जे घडलं ते अजब होतं. कारण त्यांच्या अंत्यविधीच्या वेळी सामान्यतः व्यक्तीला शेवटी जवळचा माणूस गुलाब जल देत असतो. पण त्यांच्या मुलांनी चक्क त्यांना दारूचा घोट पाजला.

आता हे ऐकून तुम्हाला अजब तर वाटलंच असेल. तर त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार वडिलांनी cपूर्वी आपल्याला दारू पाजली जावी अशी त्यांची शेवटची इच्छा असल्याचं सांगितलं होतं. त्यांच्याच इच्छेनुसार आम्ही त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांना दारूचे थेंब पाजले. जर व्यक्तीची शेवटची इच्छा पूर्ण केली, तर व्यक्तीला स्वर्ग मिळतो असं म्हटलं जातं म्हणूनच आम्हीही तेच केलं. असं त्यांचा मुलगा बंटी सिंह यांनी सांगितलं.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!