इनोव्हा आणि पीकअप टेम्पो या गाड्यांचा समोरासमोर धडक झाली. या अपघातात इन्व्होवा गाडीत असणाऱ्या सहा पैकी पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला. हा अपघात माळशेज घाट परिसरात असणाऱ्या वाटखडे गावाजवळ सोमवारी रात्रीच्या सुमारास घडला. पीकअप टेम्पो चालक यात थोडक्यात बचावला आहे.
इनोव्हा कार (एमएच ०५-एएच ६३३७) मुंबईच्या दिशेने जात होती त्याचवेळी इनोव्हा चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे कल्याणहून जुन्नरच्या दिशेने जाणाऱ्या पीक अपला (एमएच १४ जेडी ४०७४) इनोव्हा कार धडकली. या अपघातात इन्व्होवा गाडीत असणाऱ्या सहा पैकी पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर तर पीकअप टेम्पो चालक आणि इनोव्हा कार चालक सुदैवाने बचावले. जखमी चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने मृतदेह गाडीतून बाहेर काढून शवविच्छदेनासाठी रुग्णालयात पाठवले. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.