दलितांवर अन्याय झाल्यास आक्रमकपणे लढा द्या – रमेश बागवे

304 0

पुणे- दलित समाजावर विशेष करून मातंग समाजावर अन्याय अत्याचार सातत्याने होत आहेत. दलित समाजावर अन्याय अत्याचार झाल्यास अतिशय आक्रमकपणे कार्यकर्त्यांनी न्याय मिळण्यासाठी लढा उभारला पाहिजे असे आवाहन माजी मंत्री व मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक रमेश बागवे यांनी केले. पुण्यात आयोजित केलेल्या मातंग समाजाच्या राज्यव्यापी निर्धार परिषदेत ते बोलत होते.

निर्धार परिषदेसाठी मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते माननीय प्र.बा.सोनवणे, यादवराव सोनवणे, अशोकराव कांबळे ,एडवोकेट एकनाथ सुगावकर,मुख्य समन्वयक विठ्ठलराव थोरात, महिला आघाडीच्या ऍड. राजश्री अडसूळ, जिल्हाध्यक्ष अलकाताई सकट, सरचिटणीस सुरेखाताई खंडाळे तसेच महाराष्ट्र राज्यातील संघटनेचे जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष, महिला व युवक आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रमेश बागवे म्हणाले, ” मातंग समाज हा राज्यातील सर्वात मोठा दोन नंबरचा लोकसंख्या असलेला समाज असून केवळ आपसातील गटामुळे व विस्कळीतपणा मुळे आपल्यावर होणारे अन्याय-अत्याचार मध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जर आपण एकजूट नाही झालो तर भविष्यात समाजाला आणखी वाईट दिवस येतील. या करिता आजपासूनच विस्तारासाठी सर्व जिल्हाध्यक्षांनी आपापल्या भागांमध्ये काम करणे काळाची गरज आहे”

संघटनेच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांनी एकजूट करून या पुढील काळात संघटनेचा विस्तार गावोगावी, खेडोपाडी जाऊन केला गेला पाहिजे. समाजावर वाढते अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी एकसंघ राहणे अत्यंत गरजेचे आहे असे मत रमेश बागवे यांनी व्यक्त केले.

उपस्थित जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष यांना नवीन पदाचे वाटप उपस्थित प्रमुख मान्यवर व्यक्तींच्या शुभहस्ते देण्यात आले. चंद्रकांत काळोखे, रामभाऊ वाघमारे ,शिवाजी घुले, अनिल निर्भवणे, अलका सकट , सुरेखा खंडाळे अशा एकूण 25 नविन पदाधिकाऱ्यांना नवीन पदभार देण्यात आला. प्रास्ताविक श्री अरुण गायकवाड यांनी केले तर आभार संजय साठे यांनी मानले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!