अहमदनगर : कोपरगाव परिसरात पहाटेच्या सुमारास ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने ओढे नाल्यांना पूर आलाय. शहरातल्या अनेक भागांतील घरांत पाणी शिरलं आहे. शहरातील अनेक रस्ते जलमय झालेत.अनेक तळ मजल्यातील दुकानांमध्ये पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे पालिकेच्या भूमिगत गटार प्रकल्पाचा पूर्ण फज्जा उडाल्याचे दिसून आले. अचानक आलेल्या पावसाने अनेकांचे संसार उघड्यावर आले
सरकारने तात्काळ मदत करावी- ग्रामस्थांची माआहेत. सरकारने तात्काळ आम्हाला मदतीचा हात द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.