रोज तिन्हीसांजेला घरात ऐका ‘हे’ श्लोक; दुःख-दारिद्र्य निवारण, मानसिक सुख आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी सर्वोत्तम उपाय

1121 0

बऱ्याच वेळा घरामध्ये सगळं काही असतं. संपत्ती,संतती,समृद्धी पण मानसिक शांती मात्र नसते. कधी कधी एक संकट सुरू झालं की त्या मागोमाग सातत्याने संकट येतच असतात. आज जो उपाय तुम्हाला सांगणार आहे त्यातून तुमचं आत्मबल इतकं वाढेल की घरातल्या प्रत्येक संकटाला सामोरे जायला तुम्ही सामर्थ्यवान ठराल.

संकटाला सामोरे जाताना सर्वात महत्त्वाचं असतं ते तुमचं आत्मबल… बऱ्याच वेळा संकट एवढा मोठा असतं की मन खचून जातं आणि मग आता काय करायचं हे देखील सुचत नाही. अशा वेळी घरामध्ये तिन्ही सांजेला रोज घरातल्या प्रत्येकाने हे श्लोक अवश्य ऐका… तुमची परिस्थिती झटक्यात बदलणार नाही, पण हो तुमच्या सर्वांचं मानसिक बल नक्की वाढेल घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढेल.

तर मग रोज तिन्ही सांजेला तुम्हाला सुरुवात करायची आहे ती गणपती अथर्वशीर्षाने… सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरातील कोणतीही व्यक्ती जर स्वतः हे श्लोक म्हणू शकेल तर अतिउत्तम. पण आजकाल तुम्ही मोबाईल किंवा युट्युबवर देखील छान आवाजातले प्रत्येक श्लोक ऐकू शकता.

गणपती अथर्वशीर्ष नंतर तुम्हाला ऐकायचे आहे किंवा म्हणायचे आहे ती रामरक्षा.

रामरक्षा नंतर, मारुती स्तोत्र त्यानंतर हनुमान चालीसा आणि त्यानंतर वडवानल स्तोत्र हमखास ऐका.

https://www.youtube.com/watch?v=hbkcCXg_Z5c

यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवून तुमचे आत्मबल नक्की वाढेल. यानंतर आपल्या इष्ट देवाचे नामस्मरण देखील करू शकता.