पुणे : पुणे सातारा रोड नातूबाग चौक वाळवेकर नगर येथे झालेल्या चेंबरची लवकरात लवकर दुरुस्ती व नूतनीकरण करण्यात यावे. चेंबर उखडले असल्या कारणाने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे.
काही दिवसांपूर्वी याच चौकात या उखडलेल्या चेंबरमुळे अपघात होऊन एका निष्पाप नागरिकाने आपला जीव देखील गमवावा लागला . आज पर्यंत वाहनांचे जे काही नुकसान झाले तसेच जीवित हानी झाली त्याची नागरिकांना लवकरात लवकर भरपाई करून देण्यात यावी तसेच न झाल्यास भिम शक्ती संघटनेच्या वतीनेआंदोलन करण्यात येईल असा इशारा भीमशक्ती संघटनेचे विजय रामचंद्र हिंगे यांनी दिला आहे.
यावेळी शंकर साखरे ,आशिक शेख, भारत ढावरे ,शैलेश जेटेथोर ,आदित्य साखरे,भैय्यासाहेब अडसुळे तसेच अधिक मान्यवर उपस्थित होते