पुणे : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायेन्सेस, मुंबईचे माजी संचालक आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू व थोर शिक्षणतज्ज्ञ प्रा.डॉ. एस.परशुरामन यांचे आज अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले. ते ६९ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, जावाई व नातू असा परिवार आहे.
डॉ. एस.परशुरामन हे गेल्या तीन दशकापासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते. डॉ. परशुरामन यांनी पीएच.डी पासून विज्ञान मध्ये अभ्यासक्रम पूर्ण केला.आयआयटी, मुंबई, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस, मुंबईचा प्रबंध आणि मुंबई विद्यापीठाने दिलेली पदवी ते युनायटेड नेशन्सचे फेलो ऑन देखील होते. त्यांनी शिक्षक, प्रशिक्षक, कार्यकर्ता, प्रशासन आणि कर्मचार्यांच्या उन्नतीसाठी वेगवेगळ्या योजना राबविण्याचा मोठा अनुभव होता. संशोधनाच्या क्षेत्रात त्यांनी विशेष प्राविण्य मिळविले होते.
शाश्वत विकासाचे ध्येय, बालहक्क, नियोजन आणि विकास, पाणी आणि ऊर्जा संसाधने, पर्यायांचे मूल्यांकन आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया सार्वजनिक धोरण, विकास वाद, लोकांचे अनैच्छिक पुनवर्सन, जागतिकीकरण आणि शास, सामाजिक बहिष्कार आणि सर्वसमावेशक धोरण, आपत्ती व्यवस्थापन त्या बरोबर त्यांना सामाजिक मानववंशशास्त्र, लोकसंख्या शास्त्र, संशोधन शिकण्याचा समृध्द अनुभव होता. ग्रामविकास आणि पंचायती राज यावर त्यांनी काम केलेले आहे. नॅकच्या सल्लागार समितीचे सदस्य होते. त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील जवळपास ५० जर्नल्स मध्ये लेख प्रसिद्ध झालेले आहेत.
डॉ. एस. परशुरामन यांचा पार्थीव अंत्यदर्शनासाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या प्रांगणात ठेवण्यात आला होता. त्यावेळी विद्यापीठीतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“आमच्या संस्थे तर्फे दिला जाणारा भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ हा पुरस्कार २०१२ साली परशुराम यांना देऊन सन्मान केला होता. ते काही काळ आमच्या विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत होते. अतिशिय प्रेमळ व मनमिळावू स्वभावाचे ते होते. विद्यार्थ्यांमध्ये त्यांची शिक्षक प्रिय म्हणून ख्याती होती.”
कार्याध्यक्ष राहुल वि. कराड म्हणाले,“डॉ. परशुराम अतिशय कुशल प्रशासक, बुद्धिमान आणि हुशार व्यक्तीमत्वाचे होते. त्यांच्या जाण्यामुळे शिक्षण व सामाजिक क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे.”
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, कुलसचिव डॉ. प्रशांत दवे यांनी ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. तसेच मुंबई, पुणे आणि तुळजापूर येथील टिसचे अधिकारी जॉय राव व कर्मचारी, कर्वे सामाजिक संस्थेचे प्रो.दिवान, कर्मचारी व अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.