मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, महाराष्ट्र सरकारने केलेल्या चौकशीत राज्यातील ४८ शहरांत तब्बल ५ हजार २३ पाकिस्तानी नागरिक आढळल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वच राज्यांना पाकिस्तानी नागरिकांच्या वास्तव्याची माहिती घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस यंत्रणेने केलेल्या चौकशीत राज्यातील ४८ शहरांमध्ये तब्बल ५ हजार २३ पाकिस्तानी नागरिक आढळले. त्यापैकी १०७ जण बेपत्ता आहेत. त्यांचा कुठलाही शोध लागला नसल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात सर्वाधिक २,४५८ पाकिस्तानी नागपूर शहरात आढळले आहेत. त्यानंतर ठाण्यात ११०६ तर मुंबईत १४ पाकिस्तानी राहत असल्याचे दिसून आले. यातील फक्त ५१ पाक नागरिकांकडेच वैध कागदपत्रे आहेत. सार्क व्हिसा आणि शॉर्ट टाईम व्हिसावर आलेल्या पाक नागरिकांना पुढील दोन दिवसांत म्हणजे, २८ एप्रिलला भारत सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वैद्यकीय उपचारांसाठी भारतात आलेल्या पाक नागरिकांना आणखी दोन दिवस वाढवून दिले आहेत. त्यांना ३० तारखेपर्यंत भारत सोडावा लागणार असल्याचे कदम यांनी सांगितले.
पाकिस्तानी नागरिकांचे वास्तव्य असलेल्या इतर शहरांमध्ये ठाणे ११०६, जळगाव ३९३, पिंपरी चिंचवड २९०, नवी मुंबई २३९, अमरावती ११८, पुणे ११४, छत्रपती संभाजीनगर ५९, कोल्हापूर ५८, मुंबई २८, अकोला २२, रायगड १७, अहिल्यानगर १४, नंदुरबार १०, नाशिक १०, लातूर ८, बुलढाणा ७, धुळे ६, सांगली ६ गोंदिया ५, जालना ५, नांदेड ४, रत्नागिरी ४, सातारा ४, परभणी ३, पालघर १ अशी संख्या असल्याची माहिती कदम यांनी दिली.
पहलगाम हल्ल्याला करारा जबाब देंगे, म्हणजे काय? संजय राऊतांचा संतप्त सवाल
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला; पुण्यातील दोन पर्यटकांचा मृत्यू
दृश्यमपेक्षाही भयंकर प्लॅनिंग; अशोक धोडींच्या अपहरण प्रकरणाची इनसाईड स्टोरी
भगीरथ बियाणी नेमके कोण होते? त्यांच्या संशयास्पद आत्महत्येबद्दलचे अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरित
भारताचा पाकिस्तानला धक्का; पहलगामा हल्ल्यानंतर भारताने घेतले हे मोठे निर्णय
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला: पहलकांमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी हेल्पलाइन नंबर जारी
पहलगाम हल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचा संताप ; सर्व पर्यटकांना सुरक्षित परत आणणार
BEED CRIME: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून खून
‘अर्धा वाटा’ सिनेमातून PRASAD OAK, Mrinmayi Deshpande पहिल्यांदा एकत्र